Amol Kolhe | Nrendra Modi | Sharad Pawar | Lok Sabha Election 2024 । काल (दि. २९) पुण्यातील वानवडी येथील रेसकोर्सच्या मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा पार पडली. या सभेत बोलताना पंतप्रधान मोदींनी नाव न घेता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला. अतृप्त आत्मा असा उल्लेख करत मोदींनी पवारांवर निशाणा साधला.
यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील व्यासपीठावर होते. शरद पवार यांच्यावर अप्रत्यक्षरित्या केलेल्या टीकेला आता शिरूर लोकसभा मतदार संघाचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. यावेळी ते जुन्नर येथील सभेत कार्यकर्त्यांशी संवाद साधत होते.
होय….
आदरणीय पवार साहेब महाराष्ट्राचा आत्मा आहेत !#Parliament #India#NCP #AmolKolhe #Sansadratna #Shirur #junnar #Ambegaon #khed #haveli #alandi #bhosari #hadapsar #ShirurLokSabhaConstituency #katraj #pune #PuneGramin #Shivneri #ChhatrapatiShivajiMaharaj… pic.twitter.com/Cd5x06G1rX— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) April 30, 2024
यावेळी बोलताना अमोल कोल्हे म्हणाले की, “पंतप्रधान मोदींना मी फार नम्रपणे सांगू इच्छितो की होय शरद पवार हे आजच्या महाराष्ट्राचा आत्मा आहे, सर्वमान्य शेतकऱ्यांचा, महिलांचा आणि कष्टकऱ्यांचा, युकांचा आत्मा आहे.
हे जेव्हा भटकत होते जेव्हा भुजला भूकंप जाला होता तेव्हा स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी पंप्रधान होते, तेव्हा संपूर्ण संसदेत विरोधकांना विरोध न करता मी भूजच्या पुनर्वसनाला जाणार हे सांगणारे एकमेव आत्मा शरद पवार होते, आणि आज तुम्ही आरोप करता.
जेव्हा कांद्याच्या माळा घालून तुम्ही संसदेत आंदोलन करत होता ना, आणि आमच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवा सांगत होता ना, तेव्हा काही झालं तरी, माझ्या कांदा त्पादक शेतकऱ्यांच्या ताटात माती कालावणार नाही,
हे ठाम पणे सांगणारी आत्मा शरद पवार आहे. याला आम्ही पवित्र मानतो. आम्ही आमच्या आत्म्याला जपतो आणि कायम जपणार आहोत. आमचा आत्मा पक्ष, घरं फोडत नाही’. असं अमोल कोल्हे यावेळी म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या टीकेला शरद पवारांचं प्रत्युत्तर –
शरद पवार अमोल कोल्हे यांच्या प्रचारासाठी शिरुर लोकसभा मतदारसंघात आले होते. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिल आहे. मोदी यांनी शरद पवार यांचा उल्लेख भटकती आत्मा केला होता. याच मुद्द्यावरून पवारांनी मोदींना घेरले. जनतेच्या प्रश्नासाठी मी भटकतच राहील, असं उत्तर पवार यांनी दिलं.
यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, “देशाचे पंतप्रधान मोदी यांचा हल्ली माझ्यावर फार राग आहे. एकेकाळी त्यांनी भाषण केलं होतं, मी शरद पवारांच्या बोटाला धरुन राजकारणात आलो. मात्र, आता ते बोलत आहेत की, महाराष्ट्रात एक भटकती आत्मा आहे, ती अस्वस्थ आहे.
हा अस्वस्थ आत्मा गेली 45 वर्षे महाराष्ट्राचं राजकारण अस्थिर करत आहे. तो सरकार अडचणीत आणतो, असे मोदी म्हणतात. माझा आत्मा अस्वस्थ आहे हे खरं आहे. पण तो स्वत:च्या स्वार्थासाठी अस्वस्थ नाही, तर लोकांच्या दु:खासाठी अस्वस्थ आहे.
शेतकऱ्यांची दु:ख पाहून आत्मा अस्वस्थ होत असेल तर त्यामध्ये काही गैर नाही. सध्या संबंध देशातील लोक महागाईने त्रस्त आहेत. त्यांना प्रपंच करणे अवघड झाले आहे. त्यासाठी मी 100 वेळा अस्वस्थ होईन,
अशा शब्दांत शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. ते मंगळवारी अमोल कोल्हे यांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या सभेत बोलत होते.
पंतप्रधान मोदी नेमकं काय म्हणाले, होते….. Narendra Modi । shard pawar
काल पुण्यातील सभेत शरद पवारांवर अप्रत्यक्षरित्या हल्लाबोल करत नरेंद्र मोदी यांनी म्हटलं की, “ज्यांची स्वप्ने पूर्ण होत नाहीत त्यांचे आत्मे भटकत राहतात. ४५ वर्षांपूर्वी आपल्या महत्वकांक्षापोटी अस्थिर करण्याच्या खेळाची सुरूवात केली.
तेव्हापासून महाराष्ट्रात अस्थिरता आली. त्यानंतर राज्यातील अनेक मुख्यमंत्री त्यांचा कार्यकाळही पूर्ण करू शकले नाहीत. ते विरोधकांसोबत त्यांच्या पार्टीला आणि त्यांच्या परिवाराला अस्थिर करत आहेत.
१९९५ साली भाजप-शिवसेना युतीची सत्ता आल्यानंतर त्यावेळीही तो आत्मा त्या सरकारला अस्थिर करत होता. आता फक्त राज्याला नाही तर देशाला अस्थिर करण्याचे काम हा आत्मा करत आहे,” अशी टीका मोदींनी शरद पवारांचे नाव न घेता केली.