नवी दिल्ली – विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात शिवसेना पक्षाने अनेक आश्वासने दिली होती. या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी शिवसेनेला देखील सत्ता मिळाली आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले. शिवसेनेकडून देण्यात आलेल्या आश्वासनामध्ये शिवभोजन थाळीचा उल्लेख होता. त्यानुसार १० रुपयात आणि नंतर ५ रुपयात शिवभोजन थाळीची सुरुवात करण्यात आली. मात्र या शिवभोजन थाळीला भाजप खासदार आणि माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने टक्कर दिली आहे.
गौतम गंभीर यांनी दिल्लीतील न्यू अशोक नगर या भागात जन रसोई कॅन्टिनची सुरूवात केली आहे. गौतम गंभीर फाऊंडेशनद्वारे लोकांना या ठिकाणी केवळ एका रूपयात पोटभर जेवण उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यापूर्वीही त्यांनी एका जन रसोई कॅन्टिनची सुरूवात केली होती. जन रसोई केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष बिजयंत पांडा आणि दिल्ली भाजपाचे अध्यक्ष आदेश गुप्ता हे सुद्धा उपस्थित होते.
पेट भरा हो तो इंसान दुनिया की किसी भी ताकत से भिड़ सकता!
दिल्ली को प्रचार नहीं, आहार चाहिए! #DelhiSecondJanRasoi @PandaJay @adeshguptabjp pic.twitter.com/rjRHM4p83J
— Gautam Gambhir (@GautamGambhir) February 9, 2021
महाराष्ट्रात याआधीच शिवभोजन थाळी योजनेचा शुभारंभ करण्यात आला होता. सुरुवातीला लाभार्थ्यांना योजनेअंतर्गत १० रुपयांमध्ये जेवण उपलब्ध करून दिले जात होते. परंतु कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर २९ मार्च २०२० पासून ही थाळी फक्त ५ रुपयांमध्ये उपलब्ध करून दिली जात आहे.