नवी दिल्ली : देशाच्या विविध भागात लॉकडाऊनमुळे अडकलेल्या कामगारांना काही अटी व शर्तींसह राज्यात त्यांच्या कामाच्या ठिकाणी जाण्याची परवानगी देण्यात येईल असं केंद्रीय गृह मंत्रालयाने म्हटले आहे. मात्र केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी सांगितले कि, लॉकडाऊन दरम्यान 3 मे पर्यंत एका राज्यातून दुसर्या राज्यात जाण्यास बंदी कायम राहील.
SOPs issued for Movement of stranded #MigrantLabourers, for their engagement in industrial, manufacturing, construction, farming & MNREGA works, within States/UTs where they are currently located
Local Authorities to register, skill map & medically screen them for #COVID19 pic.twitter.com/PBVwwLX7Nu
— Spokesperson, Ministry of Home Affairs (@PIBHomeAffairs) April 19, 2020
गृहसचिवांनी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की कोरोना विषाणूचा फैलाव झाल्यामुळे उद्योग, शेती, इमारत आणि इतर क्षेत्रातील कामगार अडकून पडले आहेत. त्यामुळे त्यांची व्यवस्था राज्य सरकाने शिबिरांत केली आहे. सरकारची मार्गदर्शक तत्त्वे 20 एप्रिलपासून लागू होणार असून, कामगार औद्योगिक, उत्पादन, बांधकाम, कृषी आणि मनरेगाशी संबंधित कामगार काम करू शकतील.