मुंबई – पुण्यात पाच कोरोनाग्रस्त रुग्ण सापडल्याने राज्यात भीतीचे वातारण पसरले आहे. या पार्श्वभूमीवर घाबरू नका, काळजी घ्या, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे. तसेच आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या सूचनांचं पालन करण्याची विनंती करताना स्वत:चं डोकं लावून औषधं घेऊ नका, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
अजित पवार यांनी आज कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक घेतली. ते म्हणाले कि, कोरोनासंर्भात अनेक अफवा पसरविण्यात येत आहेत. परंतु, चिकन-मटण खाल्याने कोरोना होत नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, घाबरुन जाऊ नका. प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे. प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून आवाहन केलं आहे तशी काळजी घ्या. लोकांशी थेट संपर्क होणार नाही याची खबरदारी घ्या. खोकला आल्यानंतर रुमाल वापरणे अशा गोष्टींची काळजी घेण्याची नितांत गरज आहे, असेही त्यांनी सांगितले आहे.