नाशिक – नाशिकमध्ये झालेल्या बस जळीत दुर्घटनेत १३ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.मृत्युमुखी पडलेल्यांची ही आकडेवारी आणखी वाढण्याची चिंता व्यक्त केली जात आहे. नेमका हा अपघात कसा झाला हे अद्याप समोर आलेलं नसलं तरी वाहनांची डिझेलची टाकी फुटल्याने अपघात झाला असावा अशी शंका व्यक्त केली जात आहे.
यादरम्यान चिंतामणी ट्रॅव्हल्सचे संचालक गुड्डू जयस्वाल यांना बसच्या कंडक्टरने अपघाताची माहिती दिली. ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले,’ सकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान मला कंटक्टरने फोन केला आणि बस अपघाताबाबत सांगितलं. गुड्डू जयस्वाल यांनी पुढे सांगितले की,’सकाळी मला माझ्या कंडक्टरचा कॉल आला. ‘अपघात झालाय, मोठा अपघात आहे’, इतकंच तो म्हणाला. त्यालाही नेमकं काय झालंय, हे कळलं नाही. कंटक्टर अपघातावेळी नेमका बसच्या मागच्या बाजूला गेला होता.
ड्रायव्हर गाडी लेफ्ट साईडला घेत होता. तेव्हा कंटक्टर मागे पॅसेंजरला उठवायला गेला. ‘चला नाशिक आलंय’, असं म्हणत तो जेव्हा मागे गेला, तितक्यात अपघात घडला. त्याच्यामुळे अपघात कसा घडला, धडक कशी बसली, हे तोही सांगू शकला नाही. ही बस यवतमाळ ते मुंबई व्हाया नाशिक मार्गे जात होती. या बसमध्ये 30 पॅसेंजर होते, असंही त्यांनी सांगितले.
बसच्या मेन्टेनन्सबाबत त्यांनी पुढे माहिती दिली की,’बसचा फिटनेस, रेग्यूलर मेन्टेनन्स प्रत्येक ट्रीप आधी तपासला जातो, अशीही माहिती त्यांनी यावेळी दिली. पण हा अपघात असल्यामुळे नेमकं काय घडलं, याबाबत ठोस काही सांगता येऊ शकत नाही.’ असंही ते म्हणाले.