राज्य ग्राहक आयोगाची तयारी
पुणे – राज्य ग्राहक आयोगापुढे दाखल असलेल्या दाव्यांमध्ये दोन्ही बाजूच्या पक्षकारांनी आणि वकिलांनी अंतिम युक्तिवाद लेखी दाखल केल्याची तयारी दर्शविल्यास अंतिम निकाल देण्यात येईल, असे राज्य ग्राहक आयोग मुंबईतर्फे परिपत्रकाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.
करोना विषाणूचा संसर्ग होऊ नये, म्हणून लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे ग्राहक मंच, ग्राहक आयोगापुढे दाखल असलेल्या दाव्यांची सुनावणी पुढे ढकलण्यात आली. पुण्यातील ग्राहक मंचाकडून दाखल दाव्यांमध्ये चार महिने पुढील तारखा देण्यात आलेल्या आहेत.
राज्य ग्राहक आयोग, मुंबईपुढे दाखल असलेल्या दाव्यांमध्ये जर दोन्ही बाजूकडील पक्षकारांनी आणि त्यांच्या वकिलांनी दाखल दाव्यातील अंतिम लेखी युक्तिवाद ग्राह्य धरण्यात यावा, असे (पुरसिस) अर्ज दिल्यास या दाव्यांमधील अंतिम निकाल देण्यात येईल, असे आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. अशी तयारी असलेल्या पक्षकार आणि वकिलांनी संयुक्तपणे राज्य ग्राहक आयोगाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. संपर्कसाठी खालील क्रमांक उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत.
लेखी युक्तिवाद सादर करण्यासाठी संपर्क क्रमांक
भूषण पंचभाई – 9011066150
जितेंद्र ठाकूर – 9420373040
सतीश हिरे – 9822294009
आनंद जगताप -9817936377