ujjwal nikam | varsha gaikwad | Lok Sabha Election 2024 – मुंबईमधील सहा लोकसभा मतदारसंघापैकी काही मतदारसंघाचा तिढा गेले काही दिवस महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये दिसत होता. त्यापैकीच एक असलेल्या मुंबई उत्तर मध्य लोकसभेसाठी काँग्रेसने वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
या मतदारसंघात भाजपच्या विद्यमान खासदार पूनम महाजन सलग दोन वेळा निवडून आल्या होत्या. मात्र यावेळी त्यांच्या उमेदवारीबाबत भाजपकडून मौन बाळगण्यात आले आहे. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
मुंबई उत्तर मध्य मतदारसंघासाठी नसीम खान, भाई जगताप यांच्यासह इतर काही नावांची चर्चा होती. मात्र, अखेर वर्षा गायकवाड यांच्या मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातील उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. | Varsha Gaikwad
खरंतर वर्षा गायकवाड दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासही इच्छुक होत्या. मात्र, त्यानंतर दक्षिण मध्य मुंबईसाठी अनिल देसाई यांच्या नावाची घोषणा झाल्याने वर्षा गायकवाड काहीशा नाराज होत्या. पण त्यानंतर अखेर वर्षा गायकवाड यांच्याच नावावर शिक्कामोर्तब झाला.
तर दुसरीकडे आता भाजपने बडा चेहरा मैदानात उतरवला आहे. ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांना भाजपने तिकीट जाहीर केलं आहे. त्यामुळे आता या मतदारसंघात काँग्रेसच्या वर्षा गायकवाड विरुद्ध उज्वल निकम अशी लढत होणार आहे. दुसरीकडे भाजपने विद्यमान खासदार पूनम महाजन यांचं तिकीट कापलं आहे.
वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंना खुलं आव्हान दिलंय. उत्तर मध्य मुंबईमधून समोरासमोर लढण्याचं आव्हान त्यांनी ठाकरेंना दिलंय. महायुतीकडून आशिष शेलार आणि उज्वल निकम यांच्या नावाची चर्चा सुरु होती. मात्र, आता ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना महायुतीकडून उमेदवारी देण्यात आली आहे.
कोण आहेत उज्ज्वल निकम? ujjwal nikam | varsha gaikwad | Lok Sabha Election 2024
निकम हे 26/11 हल्ला आणि 20026 च्या खैरलांजी हत्याकांडासह संवेदनशील खटले हाताळण्यासाठी प्रसिद्ध ज्येष्ठ वकील आहेत. 2008 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील गुन्हेगारांच्या खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून निकम यांच्या भूमिकेकडे लक्ष वेधले गेले.
2012 मध्ये फाशी देण्यात आलेला एकमेव जिवंत दहशतवादी अजमल कसाब याला दोषी ठरवण्यात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली होती.1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटासाठी जबाबदार असलेल्यांवर खटला चालवण्यातही वकिलाची भूमिका महत्त्वाची होती.
त्याच्या कार्यामुळे या हल्ल्यांमागील सूत्रधारांपैकी एक याकुब मेमनसह अनेक प्रमुख सूत्रधारांना दोषी ठरवण्यात आले. त्यामुळे जनमानसातील त्यांची प्रतिमा चांगली आहे.