खडकी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी भाषेत उल्लेख, मुंबई पोलिसांची अवहेलना, राष्ट्रीय पक्षांच्या अध्यक्षांच्या नावाचा उल्लेख केल्याने गैरसमज पसरत आहेत, असा आरोप करत शिवसेनेचे माजी विभागप्रमुख मनीष बासू यांनी करत कंगना राणावत यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी खडकी पोलिसांकडे केली आहे.
कंगनाने आतापर्यंत कोणत्याही प्रकारचे पुरावे न देता महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का पोहोचवला आहे. संविधानाच्या मूलभूत हक्कांचा कंगना राणावत गैरवापर करत आहे. त्यामुळे कंगनावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी बासू यांनी केली आहे.