Lok Sabha Election 2024 । यंदाची लोकसभा निवडणूक महाराष्ट्रासाठी वेगळी असणार आहे याचा प्रमुख कारण म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांमध्ये पडलेली फूट आहे. पक्षामध्ये फूट पडल्यामुळे असाही अंदाज लावण्यात येत आहे की , शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे भावनिक मुद्दा निर्माण झाला आहे.
लोकसभा निवडणुकीत यामुळे भाजपला फटका बसण्याचीही चर्चा आहे.यावरूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत प्रश्न विचारला असता त्यांनी आपलं मत मांडलं आहे.
Lok Sabha Election 2024 । नेमकं काय म्हणाले मोदी
‘ही इमोशनल परिस्थिती युतीच्या बाजूने आहे. कारण बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आमच्यासोबत आहे. अधिकृत राष्ट्रवादी आमच्यासोबत आहे. त्यामुळे लोकांना वाटतंय की कुटुंबाच्या सत्तेच्या हव्यासापायी बाळासाहेबांचं स्वप्न यांनी का मोडलं. कुटुंबाच्या भल्यासाठी? आपल्या मुलाला इस्टॅब्लिश करण्यासाठी? बाळासाहेबांचा एवढा मोठा वारसा. बाळासाहेबांनी शिवसैनिकांसाठी जीवन अर्पण केलं होतं. त्यांची शिवसेना आज आमच्यासोबत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील मतदार आमच्यासोबत भावनने जोडलेला गेलाय’ असे म्हणत मोदी भावूक झाल्याचे पाहायला मिळाले
ते पुढे म्हणाले, ‘शरद राव यांच्याबाबत बोलायचं म्हणजे ही राजकीय समस्या नाही. त्यांनी हा कितीही राजकीय मुद्दा बनवला तरी महाराष्ट्रातील जनतेला कसं पटेल. हा त्यांचा कौटुंबीक प्रॉब्लेम आहे. घरातील झगडा आहे. वारसा काम करणाऱ्या मुलाला द्यायचा की मुलगी आहे तर मुलीला द्यायचा. झगडा त्याचा आहे. सिंपथीऐवजी संतापाचं वातावरण आहे की या वयात कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला काय सांभाळणार? असा सवालही मोदींनी यावेळी उपस्थित केलाय’
हे वाचाल का ? ‘काँग्रेसचे लोक कोणत्याही मंदिरात जात नाहीत, कदाचित ते माझी मुलाखती ऐकल्यानंतर जायला लागतील’