Lok Sabha Election 2024 । २०१९ मध्ये शिवसेना आणि भाजपची महायुती तुटली. अन् दोन्ही पक्ष एकमेकांचे कट्टर विरोधक बनले. त्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांमध्ये फूट पडली. यानंतर महायुतीचे सरकार राज्यात आले. या घडामोडींनंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरे यांच्याबाबत असलेल्या मैत्रीपूर्व संबंधांवर आपली भूमिका मांडली आहे.
वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले,’या मुलाखतीत मोदींनी आपण उद्धव ठाकरे आजारी असताना रोज फोन करत होतो, असं सांगितलं आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आजारी पडले होते. त्यांच्या मणक्याची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. उद्धव ठाकरे आजारी असताना मी त्यांना रोज फोन करायचो.’ असेही मोदींनी सांगितलं आहे.
ते पुढे म्हणाले,’उद्धव ठाकरे आजारी होते. तेव्हा मी त्यांना फोन केला होता. मी वहिनीला रोज फोन करून विचारायचो. ऑपरेशन पूर्वी त्यांनी मला फोन केला होता. म्हणाले, भाईसाब काय सल्ला आहे. मी म्हटलं, तुम्ही ऑपरेशन करा. बाकी चिंता सोडा. आधी शरीराकडे लक्ष द्या. बाळासाहेबांचा मुलगा म्हणून मी त्यांचा मान सन्मान करणारच. ते माझं शत्रू नाही. उद्या संकट आलं तर त्यांना मदत करणारा मी पहिला व्यक्ती असेल. एक कुटुंब म्हणून. पण बाळासाहेबांचे विचार आहे. त्यासाठी मी जगेन’ असं म्हणत नरेंद्र मोदी यांनी आपली बाजू मांडली आहे
हे वाचले का ? ‘या’ वयात कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला काय सांभाळणार? मोदींचा पवारांवर घणाघात