मुंबई – अभिनेत्री कंगना रणौतने देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहराची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्याने तिच्यावर चौफेर टीका होत आहे. अशातच राज्याचे विरोधी पक्ष नेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.
कंगनाची या वक्तव्याबत फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना, ““अभिनेत्री कंगना रणौत जे काही म्हणाली, त्याचे कोणीही समर्थन करणार नाही. भाजपाने सुद्धा याचा निषेध केला आहे. तुम्ही भले कंगना रणौतच्या मताशी सहमत नसाल पण प्रत्येक नागरिकांची सुरक्षा करणं ही राज्याची जबाबदारी आहे” अशी भूमिका मांडली.
कंगनाच्या कार्यालयाची मुंबई महापालिका अधिकाऱ्यांकडून पाहणी
काय म्हणाली होती कंगना?
अभिनेत्री कंगना रणौतने शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपल्याला मुंबई शहरात न परतण्याची धमकी दिली असा आरोप करत “याआधी मुंबईच्या रस्त्यांवर आझादीची मागणी करणारे ग्रॅफिटी दिसत होते आणि आता मला उघड धमक्या दिल्या जात आहेत. मुंबई मला पाकव्याप्त काश्मीरप्रमाणे का वाटत आहे?” असं ट्विट केलं होत.
मुख्यमंत्र्यांची कंगनावर अप्रत्यक्ष टीका; म्हणाले, ‘रोजीरोटी कमावतात, नाव कमावतात…’
सोमय्या यांचाही कंगनाची वक्तव्याला विरोध
कंगनाच्या भूमिकेबाबत सोमय्या यांनी प्रतिक्रिया देताना, “कंगना रणौतने आपलं विधान मागं घ्यायलाच हवं, तिने मुंबईबाबत विधान करीत चूक केली आहे. प्रत्येक मुंबईकर तिच्या विधानाशी असहमत आहे. मात्र महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी तिला धमकावणं हे आपण चालू देणार नाही.” असा इशारा दिला आहे.
“राज्य सरकार राज्यातील वाढत्या करोना संसर्गाची प्रकरणं तसेच या परिस्थितीशी लढण्यासाठी बेडची उपलब्धता आणि वैद्यकीय पायाभूत सुविधांबाबतच्या महत्वाच्या विषयांपासून जनतेचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करीत आहे.” असा आरोपही सोमय्या यांनी राज्य सरकारवर लगावला.
कंगनाबाबतच्या वक्तव्यावरून सोमय्यांचा गृहमंत्री देशमुखांना इशारा; म्हणाले…
गृहमंत्री अनिल देशमुख यांची प्रतिक्रिया
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना, “मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांची तुलना स्कॉटलंड यार्डशी होत असते. अतिशय सक्षमपणे मुंबई आणि महाराष्ट्र पोलीस काम करत असतात. अशा परिस्थितीत एखाद्या कलाकाराने अशा प्रकारचं वक्तव्य करणं हास्यास्पद आहे. आज मुंबई तसंच महाराष्ट्र पोलिसांच्या हाती मुंबईत सुरक्षित आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठीही ते सक्षम आहेत. जर मुंबई, महाराष्ट्र सुरक्षित आहे असं वाटत नसेल तर त्यांना मुंबईत, महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही” असं म्हंटलं होत.