मुंबई – आजपासून राज्याच्या विधिमंडळाच्या अधिवेशनास सुरुवात झाली. अधिवेशनादरम्यान बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘अनेक जण इतर प्रांतातून मुंबईत, महाराष्ट्रात येतात. रोजीरोटी कमावतात. नाव कमावतात. काही जण महाराष्ट्राचं ऋण मानतात. काही जण मानत नाहीत,’ असं म्हणत कंगना रणौतवर नाव न घेता टीका केली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी व माजी मंत्री अनिल राठोड यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करणारा प्रस्ताव मांडण्यात आला.
यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी मुखर्जींच्या आठवणींना उजाळा देत प्रणव मुखर्जी यांचं व्यक्तिमत्व अतिशय शांत, संयमी, संवेदनशील आणि अभ्यासू होतं. कोणत्याच पक्षात त्यांचे शत्रू नव्हते. सगळ्यांनाच ते आपलेसे वाटायचे, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी माजी राष्ट्रपती मुखर्जी यांना आदरांजली वाहिली.
कंगनाच्या कार्यालयाची मुंबई महापालिका अधिकाऱ्यांकडून पाहणी
‘अनिल राठोड यांच्या शोक प्रस्तावावर मला बोलावं लागेल, असा विचारही मी कधी केला नव्हता. अनिल राठोड राजस्थानातून महाराष्ट्रात आले. मुंबई, मंचरनंतर नगरला गेले. शिवसेना प्रमुखांच्या हिंदुत्वाच्या विचारानं प्रेरित होऊन त्यांनी चांगलं काम केलं’, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी राठोड यांना आदरांजली वाहिली.
कंगनाच्या मुंबईबाबतीतील वक्तव्यावर फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले…
यावेळी मुख्यमंत्र्यानी, ‘अनेक जण इतर प्रांतातून मुंबईत, महाराष्ट्रात येतात. रोजीरोटी कमावतात. नाव कमावतात. काही जण महाराष्ट्राचं ऋण मानतात. काही जण मानत नाहीत,’ असं म्हणत कंगनाला अप्रत्यक्ष टोला लगावला.
कंगनाबाबतच्या वक्तव्यावरून सोमय्यांचा गृहमंत्री देशमुखांना इशारा; म्हणाले…
तत्पूर्वी, अभिनेत्री कंगना रणौतने शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपल्याला मुंबई शहरात न परतण्याची धमकी दिली असा आरोप करत “याआधी मुंबईच्या रस्त्यांवर आझादीची मागणी करणारे ग्रॅफिटी दिसत होते आणि आता मला उघड धमक्या दिल्या जात आहेत. मुंबई मला पाकव्याप्त काश्मीरप्रमाणे का वाटत आहे?” असं ट्विट केलं होत.