कोल्हापूर – अजित पवार (Ajit Pawar) याच्या निर्णायाला स्थगिती देण्याची हिंमत कोणाची झाली नाही. महायुतीच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री नव्हे तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) हे अजित पवारांच्या निर्णयाला स्थगिती देतात, अशी खंत ठाकरे गटाचे उपनेते भास्कर जाधव (Bhaskar jadhav) यांनी व्यक्त केली आहे. भास्कर जाधव यांनी कोल्हापूर दौऱ्यात मोठे विधान केले होते.
अजित पवारांसदर्भात बोलताना जाधव पुढे म्हणाले, आतापर्यंत अजित पवारांनी ज्या ज्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात काम केले. त्यांची अजित पवारांच्या निर्णयाला स्थगिती देण्याची हिंमत केली नाही. पण आज महायुतीच्या सरकारमध्ये अजित पवारांच्या निर्णयाला मुख्यमंत्री नव्हे तर उपमुख्यमंत्री फडणवीस स्थगिती देतात. फडणवीसांचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे असतात हे समजले आहे, असेही ते म्हणाले. (Shivsena uddhav balasaheb thackeray)
मराठा आरक्षणासंदर्भात जाधव म्हणाले, राज्यात 2014 आणि 2016 ला आरक्षण मिळाले होते आणि याचा लाभही मिळाला होता. यानंतर देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आले आणि हे आरक्षण ही गेले. (Bhaskar jadhav ajit pawar)
आता राज्यात बदलून शिंदे-फडणवीसांचे सरकार येऊन दीड वर्ष झाले तरी उद्धव ठाकरे यांना दोष देतात. करोना काळात उद्धव ठाकरेंनी मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी प्रयत्न केले. निवडणुका जवळ आल्या की प्रत्येक समजाला शब्द द्याचा आणि हे फसवण्याचा उद्योग भाजपचा सुरू आहे.