Raju Shetty loksabha election : शेतकरी विरोधी भूमिका घेणाऱ्यांसोबत जाण्याचा निर्णय आम्ही कधीच घेणार नाही. आजही आम्ही सहा जागा लढवण्यावर ठाम आहाेत, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले.
शेट्टींच्या आजच्या भूमिकेमुळे पुन्हा एकदा स्वाभिमानी राजकीय पटलावर एकला चलाे रे असेच दिसून येते. दरम्यान कोल्हापूरमध्ये शाहू महाराज छत्रपती यांच्या विरोधात उमेदवार द्यायचा की नाही हे चर्चा करून ठरवणार असल्याचे शेट्टींनी माध्यमांच्या प्रश्नावर उत्तर देताना स्पष्ट केले. | Raju Shetty loksabha election
राजू शेट्टी म्हणाले, हातकणंगलेमधील वंचित उमेदवार हे भाजपचे सक्रिय कार्यकर्ते आहेत. आज देखील भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा वंचितच्या उमेदवाराने दिला नाही. त्यामुळे कुठून काय काय घडले हे तुम्हाला माहिती झाले असेल, असेही त्यांनी नमूद केले. | Raju Shetty loksabha election
कोल्हापूरमध्ये शाहू महाराज छत्रपती यांच्या विरोधात उमेदवार द्यायचा आहे की नाही हे चर्चा करून ठरवणार आहे. शाहू महाराज यांच्याबद्दल आमच्या भावना वेगळ्या आहेत. कारण शेतकऱ्यांचा प्रश्नावर शाहू महाराज यांनी नेहमी पाठींबा दिला असेही त्यांनी नमूद केले. ते म्हणाले महाविकास आघाडीने माझ्याविरोधात उमेदवार दिला तरी कोल्हापूरबद्दल आम्ही विचार करू, असे त्यांनी सांगितले. | Raju Shetty loksabha election
एकनाथ खडसेंचा भाजप प्रवेश होणार ! देवेंद्र फडणवीस म्हणतात..
अजित पवार गटाची भाजपविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार.. नेमकं प्रकरण काय ?