पिंपरी – चोरीच्या घटनांमध्ये सध्या दिवसेंदिवस वाढ होत आहे. आता गोठ्यातील गायी देखील सुरक्षित राहिल्या नाहीत. याबाबत आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल झाली आहे.
मंगळवारी ही घटना उघडकीस आली. केळगाव (ता. खेड) येथील ज्ञानेश्वर आत्माराम कडेकर (वय-30) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.
कडेकर यांचा केळगाव येथील निळोबाराय धर्मशाळेशेजारी गायींचा गोठा आहे. सोमवारी (दि. 28) रात्री दहाच्या सुमारास कडेकर हे घरी गेले होते तेव्हा त्यांना गायी चोरीस गेल्याचे आढळले.
सध्या मोबाइल चोरी, वाहनचोरी आणि घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. आता गोठ्यातील गायी देखील सुरक्षित नसल्याचे चित्र पुढे येत आहे.