मुंबई – विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये मुख्यमंत्री पदावरुन रस्सीखेच सुरू झाली आहे. त्यात शिवसेना सत्तेमध्ये 50-50 च्या फॉर्म्युल्यावर अडून बसली आहे. भाजप-शिवसेनेचा सत्तस्थापनेचा फॉर्म्युला अद्याप निश्चित झाला नसला तरीही दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली.
शिवसेना नेते दिवाकर रावते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतंत्रपणे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. यामुळे भाजप-शिवसेना एकमेकांवर दबाव टाकण्यासाठी राज्यपालांची भेट घेत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. तर राज्यपालांना केवळ दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी ही भेट घेण्यात आल्याचे दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी सांगितले आहे.
Mumbai: Maharashtra CM Devendra Fadnavis met Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari at Raj Bhavan today. https://t.co/8O4ip5NhOr pic.twitter.com/QjLQT3jT5r
— ANI (@ANI) October 28, 2019
Mumbai: Shiv Sena leader Diwakar Raote arrives at Raj Bhavan to meet Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari pic.twitter.com/kwj6dWlNNA
— ANI (@ANI) October 28, 2019
दरम्यान, विधानसभा निवडणुकीत भाजपला १०५ जागा तर शिवसेनेला ५६ जागा मिळाल्या आहेत. यामुळे सत्तास्थापनेसाठी दोन्ही पक्षांना युती करणे भाग आहे. त्यामुळे अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद का उपमुख्यमंत्री पदावरच शिवसेनेला मिळणार? हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल.