उरुळी कांचन- येथील परिसरात ईद- ए- मिलादनिमित्त मिरवणूक काढण्यात आली. यावेळी मुस्लीम तरूणांनी तिरंगा घेऊन मिरवणूक काढली. यामुळे ही मिरवणूक सर्वांचे लक्ष वेधून घेणारी ठरली. दरम्यान, रामजन्मभूमी व बाबरी मशीदचा निकाल लागला आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा अनुसूचित प्रकार घडू नये, यासाठी लोणी काळभोरचे पोलीस निरीक्षक सूरज बंडगर यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
यावेळी सरपंच राजेश्री वनारसे, उपसरपंच सुनील कांचन, डॉ. मणिभाई देसाई पतसंस्थेचे संचालक भाऊसाहेब कांचन, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते विजय तुपे, भाजपचे विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष अजिंक्य कांचन, सराफ असोशिएनचे अध्यक्ष जयप्रकाश बेदरे, अनिल कदम, फरिद सय्यद, भाऊसाहेब म्हस्के, बाळकृष्ण काकडे, भिकाजी चोरगे, जगदीश महाडिक यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मिरवणूकसाठी उरुळी कांचन दूरक्षेत्राचे सहायक पोलीस निरीक्षक पवन चौधरी, अमोल भोसले, सचिन पवार, सोमनाथ चित्तारे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.