कॉंग्रेस गरिबी, विषमता व अन्यायही हटविणार
नवी दिल्ली, दि. 8 – गरिबी गेलीच पाहिजे, विषमता हटलीच पाहिजे व अन्याय दूर झालाच पाहिजे, या नव्या घोषणेने कॉंग्रेस निवडणुकीच्या मैदानात उतरत आहे.
आपणास प्रचंड बहुमताने निवडून द्या, असे जनतेस आवाहन करताना कॉंग्रेसने असे आश्वासन दिले आहे की, आम्ही लोकशाही टिकवून ती अधिक दृढमूल करू, सर्व प्रकारचा हिंसाचार व गैरव्यवस्था नष्ट करू, म्हणजे लोकांना शांततेच्या, एकात्मतेच्या वातावरणात राहता येईल.
मी जनतेची सर्वप्रथम सेविका आहे- इंदिराजी
नवी दिल्ली – मी जनतेची सर्वप्रथम सेविका आहे, असे उद्गार पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी कॉंग्रेसचा निवडणूक जाहीरनामा जाहीर करण्याच्या समारंभप्रसंगी बोलताना काढले.
पोस्टाने मतदान!
नवी दिल्ली – आगामी लोकसभा निवडणुकीत आठ प्रकारच्या व्यक्तींना पोस्टाने मतदानाचा हक्क बजाविता येईल. राष्ट्रपती, राज्यपाल व निवडणूक कर्मचारी, लष्कर, पोलीस, त्यांच्या पत्नी, स्थानबद्ध व्यक्ती हे पोस्टाने मतदान करतील.