संशोधकांच्या एका पथकाने अलीकडेच जागतिक सायबर गुन्हेगारी निर्देशांक तयार केला असून सायबर गुन्हेगारीत भारत जगात दहाव्या स्थानावर असल्याचे म्हटले आहे.
सायबर गुन्हेगारी निर्देशांकात शंभर देशांचा समावेश आहे. सायबर गुन्हेगारीत रशिया आघाडीवर आहे. युक्रेन दुसर्या, चीन तिसर्या, अमेरिका चौथ्या, नायजेरिया पाचव्या, रोमानिया सहाव्या आणि उत्तर कोरिया सातव्या स्थानावर आहे.
भारतात नेहमीच अनेक प्रकारचे सायबर हल्ले आणि गुन्हे होतात. अलीकडच्या काळात कॉल फाॅरवर्डिंगच्या माध्यमातून सायबर गुन्ह्याचे प्रमाण वाढले आहे. टेलिकॉम कंपन्या ग्राहकांना कॉल फाॅरवर्डिंगची सुविधा देतात आणि यानुसार कॉल व मेसेज फाॅरवर्ड केला जातो. कॉल फाॅरवर्डिंग यूएसएसडी आधारित असून ती सेवा सक्रिय केल्यानंतर कॉल ङ्गॉरवर्डिंगची सुविधा मिळते. यूएसएसडी कोडचा वापर हा साधारणपणे बॅलेन्स किंवा फोनचा आयएमआय नंबर जाणून घेण्यासाठी केला जातो. या फीचरची वैशिष्ट्ये म्हणजे एक कोड डायल केल्यानंतर एकतर सेवा कार्यान्वित होते किंवा बंद करता येऊ शकते.
या सुविधेतील गैरफायदा हॅकर्स उचलतात. कॉल फाॅरवर्डिंगच्या माध्यमातून स्कॅमर ग्राहकांना फोन करतात. ते म्हणतात, ‘आम्ही टेलिकॉम प्रोव्हायडर कंपनीतून बोलत आहोत. आपल्या नंबरवर नेटवर्क इश्यू असल्याचे आम्हाला समजले. ही समस्या दूर करण्यासाठी स्टार 401 हॅशटॅग नंबर डायल करा.’ त्याच्या सूचनेनुसार आपण हा नंबर डायल केल्यानंतर एका अज्ञात नंबरवर कॉल करण्यास सांगितले जाते. ग्राहकाने कॉल करताच त्याचे सर्व कॉल आणि मेसेज स्कॅमरकडे वळतात. यात बँक आणि क्रेडिट कार्डने होणार्या व्यवहारासाठी आवश्यक असलेल्या ओटीपीचा समावेश असतो. कॉल, ओटीपीचा वापर करत स्कॅमर हा ग्राहकाच्या बँक खात्यातून पैसे काढून घेणे, सोशल मीडिया खाते अॅक्सेस करणे, नवीन सीम जारी करणे यासारखे कृत्य करतो.
कॉल फाॅरवर्डिंगच्या माध्यमातून होणार्या सायबर गुन्हेगारांना रोखण्यासाठी केंद्र सरकारने कडक पावले उचलली असून त्यानुसार 15 एप्रिल 2024 पासून यूएसएसडी आधारित कॉल फाॅरवर्डिंग सेवा बंद करण्यात आली. यामुळे स्मार्टङ्गोन ग्राहकांना मोबाइल ङ्गोन सेटिंगमध्ये बदल करण्याची सूचना दिली आहे तसेच ‘स्टार 401 हॅशटॅग’ डायल करून कॉल फाॅरवर्डिंगची सेवास्थिती जाणून घ्यावी आणि ती सक्रिय असल्यास तात्काळ बंद करावी, असे सरकारने म्हटले आहे.
गूगल सर्च इंजिनवर नागरिक प्रत्येक प्रश्नांचे उत्तर शोधत असतात. लोकांची ही मानसिकता जाणून घेत हॅकर्स पेमेंट अॅप गूगल पे, ङ्गोन पे, पेटीएमच्या नावाने आपला बनावट नंबर इंटरनेटवर शेअर करत आहेत. यानुसार नागरिक स्वत:हून हॅकर्सच्या जाळ्यात अडकताना दिसतात. आता तर ब्राउझर एक्स्टेक्शन डाउनलोडिंगच्या माध्यमातूनही सायबर गुन्हे केले जात आहेत. हे काम व्हायरसच्या माध्यमातून केले जाते. सार्वजनिक चार्जर पोर्टच्या माध्यमातून मोबाइल आणि लॅपटॉपमध्ये व्हायरस सोडला जातो. क्रोम, मोझिला आदी ब्राउझरच्या माध्यमातून ऑनलाइन व्यवहार सर्व्हरमध्ये साठविले जातात. विशेष म्हणजे प्रत्येक नागरिकांनी आपले ऑनलाइन काम आटोपल्यानंतर सर्चिंग सेटिंगमध्ये जाऊन हिस्ट्री डिलिट करायला हवी; परंतु कंटाळा केला जातो. परिणामी त्याचा ङ्गायदा सायबर गुन्हेगार उचलतात. म्हणून बँकिंग डिजिटल साधने म्हणजेच डेबिट-क्रेडिट कार्ड, एटीएम, यूपीआय, इंटरनेट बँकिंग, क्यूआर कोड आदींचा वापर काळजीपूर्वक करायला हवा.
सायबर फिशिंगनुसार एखादी मोठी नामांकित कंपनी किंवा यूजरच्या कंपनीच्या नावाने बनावट संकेतस्थळ तयार केले जाते. त्याचे स्वरूप खर्या संकेतस्थळासारखेच असते. या माध्यमातून आकर्षक मेल केले जातात आणि यात महागड्या वस्तू मोङ्गतपणे देण्याचे आमिष दाखविले जाते. मोबाइलचे प्रस्थ वाढल्याने हॅकर्स मेसेज किंवा व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून ऑङ्गर देणारे मेसेज सारखे पाठवत राहतात. यात मालवेअरयुक्त हायपर लिंक असते. मालवेअर हा संगणक किंवा मोबाइल किंवा टॅपमध्ये इन्स्टॉल सॉफ्टवेअरला नुकसान पोचवण्याबरोबरच यूजरची आर्थिक पत जसे डेबिट किंवा क्रेडिट कार्डचे विवरण, पासवर्ड, ओटीपी, मोबाइल नंबर, पत्ता, बँक खाते नंबर, जन्मतारीख आदींची चोरी करतो. ही माहिती युजरला समजण्याच्या आतच हॅकर त्याच्या मेलवरून दुसर्या बनावट मेलवर पाठवतो आणि ङ्गसवणूक करण्याबरोबरच संवेदनशील माहिती समाजकंटक लोकांनाही शेअर करतो. या मदतीने एखाद्याच्या सामाजिक प्रतिष्ठेला धक्का पोचवण्यात येतो.
आजकाल सायबर गुन्हेगार फोन कॉल्स किंवा मेसेजच्या माध्यमातून लोकांना कर्ज घेतले नसले तरी कर्जदार असल्याचे सांगत त्यांच्याकडून पैसे वसूल करतात. लोन रिकव्हरी एजंट धमकी देतात आणि तुम्ही आमच्याकडून कर्ज घेतले आहे आणि ते दोन-तीन महिन्यांत परत दिले नाही, तर आपले आक्षेपार्ह फोटो व्हायरल केले जातील, अशी धमकी देण्यात येते. यात फोटो मॉर्फही केले जातात.
एकंदरीतच यूजर शिकलेला असो किंवा अडाणी, आज सर्वच जण सायबर गुन्हेगाराला बळी पडत आहेत. ऑनलाइन ठगसेनापासून कोणीच वाचत नसल्याचे दिसून येते. मग तो शहरी असो किंवा खेड्यातील व्यक्ती. मोठे अधिकारी, बँक अधिकारी, न्यायाधीश, आमदार, खासदार, मंत्री, पोलीस देखील या गुन्हेगारांना बळी पडताना दिसून येतात.
बँकेचे डिजिटल माध्यम हे सायबर गुन्हेगारांचे कुरण ठरत आहे. सजग राहून डिजिटल साधनांच्या मार्गाने होणारी सायबर गुन्हेगारी रोखता येणे शक्य आहे. लोकांनी ब्राउंजिग करताना संशयास्पद पॉपअपपासून सावध राहावे.संकेतस्थळावर, मोबाइलवर, सावर्जनिक लॅपटॉप, डेस्कटॉपवर संवेदनशील माहिती, कार्डची माहिती शेअर करू नये. अनोळखी नंबर किंवा ईमेल आयडीतून आलेले अॅटचमेंट न पाहता ते तात्काळ डिलिट करावेत ऑनलाइन लॉटरी, कॅसिनो, गेमिंग, शॉपिंग किंवा ङ्ग्री डाउनलोड यासारख्या मेसेजकडे दुर्लक्ष करावे. वेळोवेळी सजग राहिल्यास फिशिंग मेल, मेसेज किंवा व्हॉटसअॅपच्या माध्यमातून फाॅरवर्ड होणार्या संशयास्पद हायपर लिंकच्या जाळ्यातून आपण वाचू शकतो. अशा प्रकरणात सावध राहणे हाच एकमेव बचावाचा उत्तम मार्ग आहे. आमिषाला बळी पडणे हेच सर्व समस्यांचे मूळ कारण आहे. मानसिक दबावाला बळी पडू नका. धमकी मिळाल्यास पोलिसांची मदत घेण्यास बिचकू नका. धैर्य बाळगा. तरच सायबर गुन्हेगारांपासून आपला बचाव होऊ शकतो.