मुंबई – पूर्वी एखाद्याच्या अंगावर जायला भीती देखील वाटत नव्हती परंतु आजकाल अंगावर जायलाही भीती वाटते. कारण कधी रात्री उचलून नेतील सांगता येत नाही. असं धक्कादायक विधान राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे. तसेच एका महिलेला हाताने बाजूला केल्यानंतर कशाप्रकारे गुन्हे दाखल करण्यात आले होते यावेळेसची आठवण देखील आव्हाडांनी यावेळी करून दिली.
जितेंद्र आव्हाड एका कार्यक्रमात बोलता असताना म्हणाले, “एका बाईला हाताने बाजूला केलं,तर तिने माझ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. गर्दीत बाई दिसली की मी चार फूट लांब दिसतो. मी आता शपथच खाल्लीय बायकोला सोडून कुणालाच स्पर्श करायचा नाही” असं स्पष्ट मत आव्हाड यांनी यावेळी व्यक्त केलं. आव्हाड यांनी यावेळी आपल्यावर खोटा गुन्हा दाखल केलेल्या तक्रारीची आठवण करून देत हा टोला लगावला. भाजपच्या महिला पदाधिकारीने आव्हाडांवर एका कर्यक्रमादरम्यान काही गंभीर आरोप केले होते. त्यावरून आव्हाड यांनी सत्ताधाऱ्यांवर यावेळी निशाणा देखील साधला.
सरकार म्हणजे कहर आहे. १९३२ चा कायदा काढून माझ्यावर गुन्हा टाकला. तो गुन्हा ठाण्यात लागूच होत नाही. दोन्हही वेळेला बेल देताना न्यायाधीशांनी हे गुन्हे लागू होत नाहीत तुम्ही लावलेच कसे असं म्हंटल असल्याची माहिती देखील यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी दिली. मुंबईत आग्री कोळी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते त्यानिमित्त आव्हाड बोलत होते.