Narendra Modi on India Alliance । देशासह राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. लोकसभेच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून जोरदार प्रचार सुरु आहे. महायुतीतून खुद्द देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्रात अनेक सभांचे आयोजन करण्यात आलंय. पंतप्रधान मोदींच्या आज आणि उद्या ६ सभा होणार आहेत. त्यातील पहिली सभा सोलापूरमध्ये पार पडत आहे.
सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापुरात दाखल झालेत. यावेळी त्यांनी सभेला संबोधित करताना काँग्रेस आणि इंडिया आघाडीवर सडकून टीका केली. सभेत त्यांनी “माझ्या प्रिय सोलापूरकरांना माझा नमस्कार” असे म्हणत मराठीतून आपल्या भाषणाला सुरुवात केली. तसेच २०२४ मध्ये मी दुसऱ्यांना सोलापूरकरांना भेटायला आलोय. मागच्यावेळी द्यायला आलो होतो आता घ्यायला आलो, मला तुमची धन दौलत नको मी आशीर्वाद घेण्यासाठी सोलापुरात आलोय असे म्हणत त्यांनी सोलापूरकरांना आवाहन केले.
अशा लोकांच्या हाती तुम्ही देश देणार का ? Narendra Modi on India Alliance ।
पुढे बोलताना पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेस आणि इंडिया आघाडीवर हल्लाबोल केला. त्यांनी देशातील लोकसभा निवडणुकीच्या दोन टप्प्यात इंडिया आघाडीचा पत्ता गुल झाला असल्याचे म्हटले. तसेच इंडिया आघाडीत अजूनही महायुद्ध सुरु आहे, त्यामुळे अशा लोकांच्या हाती तुम्ही देश देणार का ? असा सवाल यावेळी मोदींनी सोलपूरकरांना केला.
इंडिया आघाडी ५ वर्षात ५ पंतप्रधान बनवणार Narendra Modi on India Alliance ।
इंडिया आघाडीवर टीका करताना मोदींनी काँग्रेसच्या नव्या फॉर्म्युल्यावर निशाणा साधला. त्यांची आघाडी ५ वर्षात ५ पंतप्रधान बनवणार असल्याचे म्हणत इंडिया आघाडीवर टीका केली. तसेच नकली शिवसेनेकडे पंतप्रधानपदासाठी खूप चेहरे आहेत, असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे गटाला टोला लगावला. तसेच काँग्रेस देशातील सत्तेचं स्वप्न पाहतंय. पण मी देशातील तरुणांना डॉक्टर, इंजिनियर बनवण्याचे स्वप्न पाहत असल्याचे म्हणत त्यांनी काँग्रेसवर टीका केली.
तसेच इंडिया आघाडीकडे देशाच्या विकासाचे मुद्दे नाहीत. काँग्रेसने जाती-जमातीचा कधीच विकास होऊ दिला नाही. पण मी गरीब लोकांची सेवा करून त्यांचं कर्ज फेडत असल्याचे म्हटले. मात्र आता सभागृहात ६० टक्के जात-जमातीचे नेते उपस्थित आहेत.