नवी दिल्ली – जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० हटविण्यासंदर्भात प्रस्ताव केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मांडला. त्यामुळे विरोधकांनी राज्यसभेत तसेच लोकसभेतही चांगलाच गोंधळ केला. आजही काँग्रेसचे खासदार अधीररंजन चौधरी आणि अमित शाह यांच्यात कलम ३७० वरून जुंपली.
आम्हाला देशाचे हित हवे आहे, असे अधीररंजन चौधरी यांनी म्हणताच भाजप खासदारांनी गोंधळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर अमित शाह यांनी उत्तर देत म्हणाले, मी जेव्हा जम्मू-काश्मीर असे म्हणतो तेव्हा पाकव्याप्त काश्मीर हा त्याचाच भाग आहे असे अभिप्रेत असते. जम्मू काश्मीरच्या सीमांंमध्ये मी पाकव्याप्त काश्मीर आणि सियाचीन हे दोन्ही भाग समाविष्ट केलेले असतात, असेही अमित शाह यांनी म्हटले आहे.
LIVE: HM Shri @AmitShah is speaking in Lok Sabha. https://t.co/QQmRJpXWiD
— BJP (@BJP4India) August 6, 2019
तसेच, पाकव्याप्त काश्मीर हा जम्मू काश्मीरचाच भाग आहे तो मिळवण्यासाठी प्रसंगी प्राणांची बाजी लावू असेही शाह यांनी म्हटले आहे. काश्मीरच्या मुद्द्यावर संसदच सर्वोच्च आहे, असेही अमित शहा यांनी सांगितले.
Home Minister Amit Shah in Lok Sabha: Parliament has the right to make laws on Jammu & Kashmir. https://t.co/SQmM5ZJqGs
— ANI (@ANI) August 6, 2019