मुंबई – राज्यातील करोना संसर्गाचे प्रमाण हळूहळू कमी होताना दिसत आहे. करोनाबाधितांपेक्षा करोनामुक्त होणाऱ्यांची संख्या ही सातत्याने वाढत असल्याने मोठा दिलासा आहे. आज दिवसभरात 7 हजार 303 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
तर, राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) 89.99 टक्क्यांवर पोहचले आहे. आजपर्यंत राज्यात एकूण 15 लाख 10 हजार 353 करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
याशिवाय, आज दिवसभरात राज्यात 5 हजार 548 नवीन करोनाबाधित आढळले. तर, 74 रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर 2.62 टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 89 लाख 67 हजार 403 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 16 लाख 78 हजार 406 (18.72 टक्के) नमूने पॉझिटिव्ह आढळले आहेत.
सध्या राज्यात 25 लाख 37 हजार 599 जण गृह विलगीकरणात आहेत. तर, 12 हजार 342 जणं संस्थात्मक विलगीकरणात आहेत. तर, आज राज्यातील एकूण ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 1 लाख 23 हजार 585 आहे. राज्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या आता 16 लाख 78 हजार 406 वर पोहचली आहे.