मुंबई – राज्यातील सत्तांतरानंतर मंत्रीमंडळ विस्तार रखडला आहे अशात गेल्या तीन दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात सातत्याने बैठकांचे सत्र सुरु होते. मात्र खातेवाटपावर मार्ग निघत नसल्यामुळे आता भाजपच्या दिल्लीत बसलेल्या वरिष्ठ नेत्यांच्या समोर याबाबतचा तिढा सुटणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अशात आता काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी बोलतांना यावरून निशाणा साधला आहे ते म्हणाले,’हावरट लोक सत्तेत बसले आहेत. सत्तेशिवाय त्यांना दुसरं दिसत नाही. सेवा म्हणून काम करणारे असतील, तर सत्तेचा वाटा, पद आणि खात्यासाठी भांडण होत नाही. विकास सांगायचं पण स्वत:चा स्वार्थ साधून घ्यायचा,” अशी टीका वडेट्टीवार यांनी केली आहे.
दरम्यान, दिल्लीतील बैठकीनंतर आज मंत्री मंडळ विस्तार होण्याची चर्चा रंगली होती मात्र आता मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी मुख्यमंत्र्यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद दिला आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी वृत्तमाध्यमाशी बोलतांना सांगितलं आहे.