Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणावरून मागील काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) आणि छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.
मात्र, अश्यातच पुन्हा एकदा छगन भुजबळ यांनी मनोज जरांगेवर हल्लाबोल केलाय. ‘जशी संस्कृती तशीच टीका केली जाते’ असं म्हणत छगन भुजबळांनी मनोज जरांगेंवर टीका केली.
जशी संस्कृती तशी टीका केली जाते. ज्याचे जसे शिक्षण, संस्कृती असते तसेच ते खालच्या पातळीवर टीका करतील. टीका करायला चांगले शब्द सापडतात नाही. चांगल्या शब्दाचा अभ्यास नसेल तर ते तसेच बोलतील. माणसाने सुसंस्कृत असेल पाहिजे. थोड शिक्षण कमी असले तरी चालतं.
कोणाला कसा मान सन्मान द्यावा यासाठी सुसंस्कृत असणं गरजेचं आहे. दोनशे बेकायदेशीर पिस्तूलांची आयात जालना जिल्ह्यात झालीये. काही वाळूवाले, काही माफिया आजूबाजूला असतील तर ते तसेच शिकणार’, अशी जोरदार टीका छगन भुजबळांनी केली आहे.
ओबसींवर अन्याय झाला तर ते मतदान करणार नाहीत….
यावेळी बोलताना भुजबळ म्हणाले, “हे जर ओबीसींमध्ये आले तर कोणालाच काहीच मिळणार नाही. आरक्षण त्यांना मिळालेच, थोडी अडचण आहे. पण तीही दूर होईल. पण ओबीसीतूनच आरक्षण हवे असा अट्टाहास का?
असा सावल यावेळी छगन भुजबळ यांनी उपस्थित केलाय. सरकारने जरी हा अट्टाहास पूर्ण केला, तर ओबीसी पण नाराज होतील. मराठा समाज मतदान करणार नाही म्हणता, पण जर ओबसींवर अन्याय झाला तर तेही मतदान करणार नाही’. असं ते म्हणाले.