Buldhana Bus Accident : विदर्भ ट्रॅव्हल्सच्या नागपूरहून पुण्याला जाणाऱ्या बसला बुलढाणा येथील पिंपळखुटा या ठिकाणी समृद्धी महामार्गावर अपघात झाला. या अपघातात २५ जण ठार झाले आहेत. दुभाजकाला गाडी धडकली आणि त्यानंतर बसचा टायर फुटून ती उलटली. डिझेलचा टॅंक फुटल्याने बसला आग लागली. या आगीत होरपळून २५ प्रवासी ठार झाले आहेत. दरम्यान, या अपघातावर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी दुःख व्यक्त केले आहे.
आज सकाळी या अपघाताची बातमी समोर येताच महाराष्ट्रासह संपूर्ण देश हादरून गेला.दरम्यान, यावर विविध राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येत असून राहुल गांधी यांनी देखील यावर ट्विट करत दुःख व्यक्त केले आहे.
महाराष्ट्र के बुलढाणा में हुई बस दुर्घटना का समाचार बहुत दुखद है।
इस कठिन समय में सभी शोकसंतप्त परिवारजनों को अपनी गहरी संवेदनाएं व्यक्त करता हूं। घायलों के जल्द से जल्द स्वस्थ होने की आशा करता हूं।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) July 1, 2023
त्यांनी ट्विट करत,” महाराष्ट्रातील बुलढाणा येथील बस अपघाताची बातमी अत्यंत दु:खद आहे. या कठीण प्रसंगी मी सर्व शोकग्रस्त कुटुंबियांबद्दल माझ्या संवेदना व्यक्त करतो. मी जखमींच्या लवकरात लवकर बरे होण्याची आशा करतो.” असे म्हटले आहे.