कोल्हापूर (प्रतिनिधी) – केंद्र सरकारने नव्याने बनवलेल्या कृषी विधेयक लागू करण्यास राज्य सरकारनं स्थगिती दिली आहे. या स्थगिती आदेशाची होळी आज भारतीय जनता पार्टीच्या किसान मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे.
कोल्हापुरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत होळी करण्यात आलीय. केंद्राने केलेला नव्या कृषी विधेयकाचं भाजप नेत्यांनी यावेळी समर्थन केले आहे.
तसेच शशिकांत शिंदे यांनी केलेल्या अर्जावर सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी स्थगिती दिल्यानंतर स्थगिती आदेशाची होळी आज भाजपकडून करण्यात आलीय.
तसेच हा कायदा महाराष्ट्रात लागू होण्यासाठी भाजप इथून पुढे ही आंदोलन करेल असा इशारा आंदोलकांनी दिला आहे.