आम आदमी पक्ष हा काही वेगळा पक्ष नसून तो भारतीय जनता पार्टीचाच सहकारी पक्ष आहे. 2012 च्या इंडिया अगेन्स्ट करप्शनमध्ये या पक्षाचा जन्म झाला आहे व तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अर्थात आरएसएसची संघटना आहे असा दावा आणि टीका कॉंग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी केली आहे. तसेच गुजरातमध्ये खरी लढत कॉंग्रेस आणि भाजप यांच्यातच आहे. आम आदमी पार्टीने आपले उमेदवार केवळ कॉंग्रेसची मते खाण्यासाठी आणि भाजपला मदत करण्यासाठी उभे केले आहेत, असे रमेश यांनी सांगितले.
यावर आता भाजप नेते अतुल भातखळकर यांनी ट्विट काँग्रेसवर टीका केली आहे,’सत्ता प्राप्तीच्या लालसेपोटी काँग्रेस अशी बेताल वक्तव्य करून अधिकच गाळात रुतत चालली आहे… आता काँग्रेसचा राग येत नाही तर कीव करावीशी वाटते… Congress ला चळ लागले आहे…’ असं म्हणत त्यांनी काँग्रेस पक्षावर खोचक टीका केली आहे.