मुंबई : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेसोबत केलेल्या बंडानंतर महाराष्ट्रातील राजकारण ढवळावून निघाले आहे. शिवसेना एकनाथ शिंदेंची नाराजी दूर करण्यात यशस्वी होणार का ? की सत्तांतर होणार ? याकडे राजकीय वर्तुळात घमासान चर्चा सुरु आहे. शिवाय एकनाथ शिंदे यांच्यासोबाबत 40 आमदार असल्याचे त्यांनी म्हंटले आहे. त्यामुळे भाजप आणि एकनाथ शिंदे सत्तास्थापनेचा विचार तर करीत नाही ना ? अशी चर्चा सुरु आहे.
एकनाथ शिंदे यांनी स्वतः आपल्याकडे 40 आमदार असल्याचे म्हंटले आहे. शिवाय दुसरीकडे भाजपकडे देखील चांगले संख्याबळ आहे. शिवाय संख्याबळाची जुळवाजुळव महाविकास आघाडी आणि भाजप दोन्ही पक्षांकडून सुरु आहे. एकनाथ शिंदे यांना 37 संख्याबळ गाठायचे होते मात्र त्यांच्याकडे सध्या 40 आमदारांची संख्या असल्याचं त्यांनी स्वत : सांगितले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला हा मोठा धक्का मनाला जात आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे हे भाजपसोबत सत्ता स्थापन करणार का ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
शिवाय काँग्रेस आणि शरद पवार यांच्या सध्यक्षतेखाली बैठका सुरु झाल्या आहेत. शिवाय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे 1 वाजता बैठक घेऊन महतवाची माहिती सांगणार असल्याचे समजते आहे. शिवाय भाजप नेत्यांची सुद्धा बैठक सुरु झाली आहे.