मुंबई – राज्यात येत्या पाच दिवसांत उष्णतेची लाट येऊ शकते, असा अंदाज भारतीय हवामान विभागाच्या प्रादेशिक हवामान मुंबई केंद्राने वर्तवला आहे. त्यानुसार 28, 29, 30, 31 मार्च आणि 1 एप्रिल रोजी राज्यात जास्त प्रमाणात उष्णता असण्याची शक्यता आहे.
दरम्यान, भिवंडीत तापमान 39 डीग्रीवर पोहोचले आहे. पुढील तीन दिवसांत पश्चिम हिमालयीन प्रदेश आणि गुजरात राज्याकडून उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रातील जळगाव, औरंगाबाद, अहमदनगर, जालना, परभणी अन्य जिल्ह्यामध्ये उष्णतेची लाट तीव्र जाणवेल, असा अंदाज वर्तवला आहे.