बारामती : पालखी आगमन झाल्यानंतर व पालखीचे प्रस्थान झाल्यावर संपूर्ण बारामती शहरासह मोतीबाग विसाव्या पर्यंत “केवळ तीन तासांतच’ संपूर्ण शहराची स्वच्छता करण्यात आली. ३० टन कचरा केवळ तीन तासात साफ झाला.
मुख्याधिकारी महेश रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली व आरोग्य निरीक्षक राजेंद्र सोनवणे,अजय लालबिगे यांच्या सुचनेप्रमाणे आरोग्य विभागाच्या व एन.डी.के कंपनीच्या कर्मचारी यांच्याकडुन शहरातील रस्ते व परिसर स्वच्छ करण्यात आला.
यामध्ये तीस टनापेक्षा जास्त कचरा साफ करण्यात आला. यासाठी ४मोठी वाहने, ट्रॅक्टर,४०७वाहनासह ११घंटागाड्या कचरा उचलण्यासाठी व्यवस्था करण्यात आली होती.
बारामती नगरपरिषद प्रशासनाने स्वच्छतेची परंपरा कायम राखली. गतवर्षी देखील पालखी सोहळ्याच्या प्रस्तारानंतर अशा प्रकारची स्वच्छता करण्यात आली होती.