नवी दिल्ली – देशाची फाळणी हा एक भयावह अनुभव आहे. ही फाळणी विसरताच येणार नाही. आपल्या लक्षावधी बंधु भगिणींना त्यामुळे स्थलांतर करावे लागले. द्वेषाच्या वातावरणामुळे जो हिंसाचार झाला त्यात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत, असे नमूद करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 14 ऑगस्ट हा दिवस फाळणीच्या भयावह अनुभवाचा स्मृती दिन म्हणून पाळला जावा असे प्रतिपादन पंतप्रधानांनी केले आहे.
आज ट्विटरवर त्यांनी हे प्रतिपादन केले आहे. भाजप आणि संघ परिवाराने कॉंग्रेस पक्ष व त्यांच्या नेत्यांनाच फाळणीबद्दल जबाबदार धरून त्यावेळी झालेल्या हिंसाचाराचा ठपकाही त्यांनी आत्तापर्यंत कॉंग्रेसवरच ठेवला आहे. फाळणीमुळे मोठा हिंसाचार झाला.
जाळपोळ झाली त्याची सारी जबाबदारी संघ परिवारातील नेत्यांनी सातत्याने कॉंग्रेसवरच ठेवली आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी आज फाळणीचा स्मृती दिन पाळण्याचे जे आवाहन केले आहे त्याला महत्व दिले जात आहे.