नवी दिल्ली – ट्विटर ही सोशल मीडिया साईट पक्षपातीपणा करीत असल्याचा आरोप कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला होता. काही महत्वाच्या विरोधी पक्ष नेत्यांची खाती ट्विटरने तात्पुरत्या स्वरूपात बंद केली आहेत, त्यांची ही कृती म्हणजे देशाच्या राजकारणातील हस्तक्षेप आहे, असं त्यांनी म्हटले होतं. त्यानंतर ट्विटरने आता माघार घेतली असून राहुल यांचं ट्विटर अकाउंट अनलॉक करण्यात आलं आहे.
दिल्लीत अल्पवयीन मुलीवर झालेला बलात्कार आणि हत्येनंतर पीडितेच्या कुटुंबीयांची राहुल यांनी भेट घेतली होती. तसेच त्याचे फोटो ट्वीट केले होते. याविरोधात राष्ट्रीय बालहक्क आयोगाने ट्विटरला नोटीस बजावल्यानंतर राहुल गांधींचे ट्विटर खातं ६ ऑगस्टला बंद करण्यात आलं होतं.
तब्बल आठ दिवसांनी ट्विटरने कारवाई मागे घेत राहुल यांचं खातं अनलॉक केलं आहे. राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसच्या २३ नेत्यांची ट्विटर खाती पुन्हा सुरु करण्यात आली आहे. ट्विटर खातं पुन्हा सुरू होताच मुंबई यूथ काँग्रेसने ‘सत्यमेव जयते’ असं ट्विट केलं आहे.
Satyamev Jayate 🇮🇳🇮🇳
— Mumbai Youth Congress (@IYC_Mumbai) August 14, 2021
राहुल यांनी शुक्रवारी ट्विटरवर संताप व्यक्त केला होता. जी कंपनी सरकारच्या प्रभावाखाली आहे आणि ती जर आपल्याला राजकारण कसे करायचे याचे धडे घालून देत असेल तर अशी कंपनी चालू ठेवायची काय याचा विचार करण्याची वेळ आली आहे, असेही राहुल गांधी यांनी म्हटले होतं.
Twitter unlocked all accounts linked to Congress, including that of Rahul Gandhi today morning. This is the win of the people of India: Rohan Gupta, Chairman of Congress’ Social Media Department https://t.co/7k5dEerrwp
— ANI (@ANI) August 14, 2021
दरम्यान राहुल यांचं ट्विटर अकाउंट अनलॉक केल्यानंतर ट्विटरकडून अद्याप काहीही प्रतिक्रिया आलेली नाही.