Supreme Court on Rahul Narvekar : आज न्यायालयासमोर झालेल्या सुनावणीत सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी राहुल नार्वेकरांना सुनावणी प्रलंबित ठेवल्यावरून खडेबोल सुनावले आहे. यावरून राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातील आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.
जितेंद्र आव्हाड ट्विटर
मा. सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या झालेल्या सुनावणीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेना यांच्या याचिका एकत्रितच ऐकल्या जातील ह्याबाबत मा. न्यायालयाच्या मनात कुठलाही संदेह नाही.
सोबत मा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची प्रत जोडत आहे. pic.twitter.com/4ALZvC6wA9
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) October 13, 2023
माध्यमांशी बोलतांना जितेंद्र आव्हाड म्हणाले,’शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोन्हींच्या वेळापत्रकावर निर्णय एकत्रित होईल. कारण दोन्ही याचिका टॅग केलेल्या आहेत. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांना या दोन्ही पक्षांबाबत एकत्रित वेळापत्रक द्यावं लागेल. मला आनंद या गोष्टीचा आहे की, आज सुरुवातीपासून सर्वोच्च न्यायालय थोडंसं आश्चर्यचकित आणि थोडं नाराज दिसत होतं.” असंही आव्हाड म्हणाले आहे.
ते पुढे म्हणाले,’सर्वोच्च न्यायालयाने एक वाक्य उच्चारलं. ते माझ्या दृष्टीने या सुनावणीतील सर्वात महत्त्वाचं आहे. ते वाक्य म्हणजे तुम्ही सर्वोच्च न्यायालयाचं म्हणणं गांभीर्याने घेत नाहीत. जेव्हा सर्वोच्च न्यायालय तुम्ही आम्हाला गांभीर्याने घेत नाहीत असं म्हणतं, तेव्हा त्याचा अर्थ काय हे मी भारताला सांगायला नको’ असं म्हणत आव्हाड यांनी टोला लगावला आहे.