Ram Mandir Opening: अयोध्येत 22 जानेवारी रोजी राम लल्लाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होणार आहे. त्यापूर्वी एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी मुस्लिमांकडून पद्धतशीरपणे बाबरी मशीद हिसकावल्याचा आरोप केला आहे.
ओवेसी म्हणाले, “बाबरी मशीद भारतीय मुस्लिमांकडून पद्धतशीरपणे हिसकावून घेण्यात आलीय, मुस्लिम तेथे 500 वर्षे नमाज अदा करत होते. जेव्हा कॅंग्रेसचे जीबी पंत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते तेव्हा रात्रीच्या अंधारात मशीदीमध्ये मूर्ती ठेवण्यात आली होती आणि पुन्हा ती काढली नाही.”
मुस्लिमांना न सांगता कुलूप उघडले –
कर्नाटकातील कलबुर्गी येथे पत्रकारांशी संवाद साधताना ओवेसी म्हणाले की, त्यावेळी तेथील जिल्हाधिकारी नायर साहेब होते. त्यांनी मशीद बंद करून तिथे पूजा सुरू केली. यानंतर 1986 मध्ये मुस्लिमांचे न ऐकता मशिदीचे कुलूप उघडण्यात आले. इतकेच नाही तर बुटा सिंग यांनी पायाभरणी केली.
1992 मध्ये मशिदीला शहीद केले –
6 डिसेंबर 1992 रोजी भाजप आणि संघ परिवाराने मशीद शहीद केली असा आरोप त्यांनी केला. ओवेसी म्हणाले की, विश्व हिंदू परिषद स्थापन झाली तेव्हा राम मंदिर नव्हते.
सर्वोच्च न्यायालयाबद्दल बोलताना ओवेसी म्हणाले, हा निश्चितपणे सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आहे. ही टायटल सूट ची केस होती. श्रद्धेच्या आधारावर आम्ही ही जमीन मुस्लिमांना देऊ शकत नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे. मंदिर पाडून मशीद बांधली नसल्याचेही न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटले आहे.
या निर्णयानंतर मी सांगितले होते की, या निर्णयानंतर आणखी बरेच मुद्दे खुले होतील. आज तुम्ही पाहत आहात की संघ परिवार सगळीकडे जातो आणि म्हणतो की येथे मशीद नव्हती. माझा विश्वास आहे की जर जीबी पंत असते तर. पुतळे काढले नाहीतर कुलूप उघडले नाही तर हा दिवस पाहावा लागला असता का? आमच्या प्रश्नांची उत्तरे कोणी देत नाही.