मुंबई – लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविड संदर्भात अत्यावश्यक सेवेसाठी 4 लाख 44 हजार 333 पास पोलीस विभागामार्फत देण्यात आले. तसेच 6 लाख 03 हजार 741 व्यक्तींना क्वारंटाइन करण्यात आले आहे.अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.
करोनाचा मुकाबला करण्यासाठी आपले पोलीस दल, आरोग्यविभाग, डॉक्टर्स, नर्सेस अहोरात्र मेहनत घेत आहेत; परंतु काही दुष्ट प्रवृत्ती त्यांच्यावर हल्ला करीत आहेत. अशा हल्लेखोरांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस विभागाला देण्यात आलेले आहेत. यादरम्यान पोलिसांवर हल्ला होण्याच्या 258 घटना घडल्या. त्यात 838 व्यक्तींना ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू आहे.
100 नंबर-99 हजार फोन
पोलीस विभागाचा 100 नंबर हा सर्व जिल्ह्यात 24 तास कार्यरत असतो. लॉकडाऊनच्या काळात या फोनवर 99 हजार 516 फोन आले. त्या सर्वांची योग्य ती दखल घेण्यात आली. तसेच राज्यभरात पोलिसांनी ज्यांच्या हातावर क्वारंटाइन (र्टीरीरपींळपश) असा शिक्का आहे अशा 706 व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठविले. राज्यात एकूण 6 लाख 03 हजार 741 व्यक्ती क्वारंटाइन (र्टीरीरपींळपश) आहेत. अशी माहिती देशमुख यांनी दिली.
या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या 1330 वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले व 77 हजार 425 वाहने जप्त करण्यात आली. तसेच परदेशी नागरिकांकडून झालेले व्हिसा उल्लंघनाचे 15 गुन्हे राज्यभरात नोंदवले आहेत.