मुंबई : देशात गोव्यासह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका पार पडल्या. त्यामध्ये भाजपने विजय मिळवल्यानंतर राज्यात देखील आत्तापासूनच निवडणुकांचे वारे वाहायला लागले आहेत. भाजपने २०२४ मध्ये स्वबळावर सत्ता स्थापन करण्याचा निर्धार व्यक्त केला असताना दुसरीकडे एमआयएमने महाविकास आघाडी आणि विशेषत: राष्ट्रवादी काँग्रेसला युतीची ऑफर दिली आहे. या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया उमटू लागल्या असताना भाजपा आमदार नितेश राणे यांनी ट्विटरच्या राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला युतीची ऑफर दिली आहे. या पार्श्वभूमीवर नितेश राणेंनी टोला लगावला आहे.
वाह.. AIMIM ची महाविकास आघाडी मध्ये येण्याची तयारी..
कट्टरपंथीना पण शिवसेना आपलीशी वाटायला लागली आहे..
आता फक्त ISIS चा प्रस्ताव येणे बाकी आहे..
खरंच, करून दाखवलं!!— nitesh rane (@NiteshNRane) March 19, 2022
वाह.. AIMIM ची महाविकास आघाडी मध्ये येण्याची तयारी..
कट्टरपंथीना पण शिवसेना आपलीशी वाटायला लागली आहे..
आता फक्त ISIS चा प्रस्ताव येणे बाकी आहे..
खरंच, करून दाखवलं!!— nitesh rane (@NiteshNRane) March 19, 2022
नितेश राणेंनी ट्विटरच्या माध्यमातून निशाणा साधला आहे. “वाह..एमआयएमचीही महाविकास आघाडीमध्ये येण्याची तयारी. कट्टरपंथींना पण शिवसेना आपलीशी वाटायला लागली आहे. आता फक्त ISIS चा प्रस्ताव येणे बाकी आहे. खरंच करून दाखवलं”, असे ट्वीट नितेश राणे यांनी केले आहे.
“आमच्यावर आरोप करण्यात येतात की भाजपा आमच्यामुळे जिंकते. त्यामुळे मी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भेटायला आले असता त्यांना ऑफर दिली आहे. एकदा हे संपवायचं असेल, तर तुम्ही आमच्यासोबत युती करायला तयार आहात का? त्यावर ते काही बोलले नाहीत. आता बघायचं आहे की त्यांना फक्त आरोप करायचे आहेत की त्यांना त्यांची भूमिका सिद्ध करायची आहे”, असं इम्तियाज जलील म्हणाले.
एकीकडे एमआयएमने युतीसाठी महाविकास आघाडीसमोर हात पुढे केला असताना दुसरीकडे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मात्र हा प्रस्ताव फेटाळून लावला आहे. “महाराष्ट्रात तीन पक्षांचच सरकार राहील. राज्यातले तीन सत्ताधारी पक्ष शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या विचारानं चालणारे पक्ष आहेत. ते आमचे आदर्श आहेत. एखाद्या पक्षाचे नेते औरंगजेबाच्या कबरीपुढे गुडघे टेकतात, ते महाराष्ट्राचे आदर्श होऊ शकत नाहीत. त्यामुळे या युतीच्या अफवा आहेत”, असे राऊत म्हणाले आहेत.