मुंबई – राज्याच्या राजकारणात भूकंप झाला आहे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. अजित पवारांनी दिलेला अल्टिमेटम शरद पवारांनी मान्य न केल्यामुळे शरद पवार नाराज असल्याची माहिती समोर आली होती.
अजित पवारांकडे 25 आमदारांचा पाठिंबा असल्याचे पत्र अजित पवारांकडे आहे. राजभवनाकडे शासकीय गाडी न वापरता खासगी वाहनाचा वापर केला आहे. छगन भुजबळ यांच्यासह अन्य नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.
दरम्यान, आता महाराष्ट्रला आता दोन उपमुख्यमंत्री मिळाले आहे. महाराष्ट्राला पहिल्यांदाच दोन उपमुख्यमंत्री मिळाले आहेत. दरम्यान भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आता उपमुख्यमंत्री बनले आहे.