मुंबई: अजित पवारच राष्ट्रवादीचे गटनेते आहेत ते जो व्हिप काढतील तोच लागू होणार. आणि त्यांनी दिलेला व्हिप सर्व आमदारांसाठी बंधनकारक असेल. त्यांनी सांगितल्यानुसारच आमदारांना मतदान करावं लागेल. तसेच राज्यपालांनी घटनात्मक चौकटीचे पालन केले असून कोठेही पायमल्ली नाही. अजित पवार यांनी आमदारांच्या समर्थनाचे पत्र देऊन राज्यात भाजपची सत्ता आली असल्याचे भाजप नेते रावसाहेब दानवे म्हणाले.
दानवे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर टीका केली. संजय राऊतांना वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करा. सत्तेची वाट पाहताना त्यांना लागलं आहे.
दानवे म्हणाले, राष्ट्रवादी काँगेसने अजित पवारांना गटनेते पदावरुन काढलं आहे, असा दावा राष्ट्रवादीकडून करण्यात आला आहे. परंतु अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गटनेते पदावर कायम आहेत. तसेच आम्ही अराजकीय मार्गाने सत्तास्थापन केल्याचा शिवसेनेचा आरोप खोटा आहे. शिवसेनेने राज्यपालांनी घटनेची पायमल्ली केल्याचा आरोपदेखील बिनबुडाचा आहे.