मुंबई – राज्यात अद्यापही सत्तास्थापनेचा तिढा कायम असून शिवसेना मुख्यमंत्रीपदावर ठाम आहेत. काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून फार काळ राहावे, असा डाव महाराष्ट्रात सुरु आहे. परंतु, बहुमत असेल तर सिद्ध करा. घटनेनुसार मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यावाच लागेल, असे वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केले आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्तक्षेपाविषयी संजय राऊत म्हणाले, मुख्यमंत्रीपदाचे लेखी पत्र घेऊन नितीन गडकरी येणार असतील तर माध्यमांचा निरोप मी उद्धव ठाकरेंना देतो. जर राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली तर हा महाराष्ट्रावर अन्याय होईल, असेही त्यांनी म्हंटले आहे.
Sanjay Raut, Shiv Sena: If President’s rule is imposed in the Maharashtra, it will be disrespect to people of the state. pic.twitter.com/ObNZ4LYi2N
— ANI (@ANI) November 8, 2019
घोडेबाजारविषयी बोलताना राऊत म्हणाले, महाराष्ट्रात कर्नाटकप्रमाणे घोडेबाजार होईल असे माध्यमांना वाटत असेल तर महाराष्ट्रात पारदर्शकता शिल्लक नाही असे म्हणावे लागेल. महाराष्ट्र कधीही कोणासमोर झुकणार नाही. शरद पवार झुकले नाहीत. उद्धव ठाकरेही झुकणार नाहीत, असे त्यांनी सांगितले आहे.