मुंबई: राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी आणि काँग्रेसला सोड चिठ्ठीदेत अनेक नेतेमंडळींनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. केंद्रात भाजपची सत्ता असून राजयताही भाजपच्यच बाजूने वारे असल्याने भाजपचेच सरकार येणार या अपेक्षेने हे नेते भाजपमध्ये दाखल झाले होते. परंतु झालं उलट सत्ता आली महविकास आघाडीचे त्यामुळे आता हे नेते पुन्हा घरवापसी करणार का या चर्चाना उधाण आले आहे. यावर खुद्द नारायण राणेंनी भाष्य केलं आहे.
निवडणुकीपूर्वी माजी मुख्यमंत्री नारायण राणे आणि त्यांचे सुपुत्र नितेश आणि निलेश यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला होता. कणकवलीतून नितेश राणे भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवत निवडूनही आले. मात्र भाजपाची सत्ता येईल असं वाटत असताना राज्यात सत्तेचं वेगळेच नाट्य पाहायला मिळालं आणि भाजपला विरोधी बाकावर बसावे लागले. त्यानंतर नारायण राणे आणि कुटुंब भाजप सोडणार का? अशी चर्चा जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात सुरु होती.
या चर्चेवर भाजपाच्या कार्यकर्ता मेळाव्यात नारायण राणे यांनी भाष्य केलं आहे. ‘मी आता अन्य कोणत्याही पक्षात जाणार नसून, यापूर्वी दोन पक्ष बदलले, आता पक्ष बदलणार नाही. मी आणि माझे दोन्ही मुलं शेवटपर्यंत भाजपामध्येच राहतील असा विश्वास त्यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे.
दरम्यान राणे यांनी शिवसेनेतुन बाहेर पडत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. काँग्रेस सरकारच्या काळात ते मंत्रीदेखील होते. मात्र त्यानंतर नारायण राणेंनी काँग्रेसमधून बाहेर पडत ‘महाराष्ट्र स्वाभिमान’ या नव्या राजकीय पक्षाची स्थापना केली. पक्षाची स्थापना केल्यानंतर राणेंनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत यशही मिळविले. नारायण राणे भाजपाच्या कोट्यातून राज्यसभेवर खासदार म्हणून आहेत.