नागपूर : बलात्कारातील आरोपींना १०० दिवसांत फाशी दिली जावी असा प्रस्ताव शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी सरकारला दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रस्तावाची दखल घेऊन मुख्य सचिवांकडून अहवाल मागवला असल्याची माहिती आमदार सरनाईक यांनी दिली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आंध्र प्रदेशने जो कायदा केला आहे, तो राज्यात कशाप्रकारे लागू होऊ शकते यासंबंधी अहवाल आणि मसुदा मागवला आहे असं प्रताप सरनाईक यांनी सांगितलं आहे. “राज्यात अत्याचाराचे प्रमाण वाढत आहे. बलात्कारातील आरोपीना कठोर शिक्षा झाली पाहिजे.
मी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री एकनाथ शिंदे यांना हा कायदा अंमलात आणण्याची मागणी केली आहे”. नागपुरात विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनातही हे विधेयक संमत होऊशकतं असे प्रताप सरनाईक म्हणाले. विधेयकाला मंजुरी मिळाली तर महाराष्ट्र देशातील दुसरं राज्य ठरेल असं प्रताप सरनाईक यांनी सांगितले.