मुंबई – महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू केली जाणार असल्याची अफवा भाजपकडूनच पसरवली जात आहे. पण त्यात अजिबात तथ्य नसून हे महा आघाडीचे सरकार अत्यंत भक्कम आणि स्थीर आहे.
हे सरकार आपला पाच वर्षाचा नियोजित कालावधी पूर्ण करेल असा दावा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. ते म्हणाले की, आघाडीतील तिन्ही पक्ष एकत्र असून आमच्याकडे पुरेसे आमदार आहेत. त्यामुळे सरकार पडण्याचा संबंध येत नाही.
करोना नियंत्रणाच्या संबंधात केंद्र सरकारकडून जी मार्गदर्शक तत्वे जारी केली जात आहेत त्याचे महाराष्ट्रात पद्धतशीरपणे पालन केले जात आहे. राज्यात करोनाची चाचणी करण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. आमचे सरकार करोनाच्या बाबतीत योग्य ती उपाययोजना करीत असून सरकारच्या कामाच्या बाबतीतही भाजप लोकांमध्ये गैरसमज पसरवण्याचे काम करीत आहे असा आरोपहीं मलिक यांनी केला आहे.