नवी दिल्ली : जर बॅंकांशी संबंधित तुमची काही काम असल्यास आजपासून पुढच्या तीन दिवसांत पुर्ण करून घ्या कारण या आठवड्यात गुरुवारपासून चार दिवस बॅंका बंद राहणार आहेत. 26 आणि 27 सप्टेंबर रोजी बॅंकांचे कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संप असणार आहे. तर पुढील दोन दिवस शनिवार व रविवारी असल्यामुळे बॅंकांच्या कामांना सुट्टी असणार आहे.
सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांच्या विलीनीकरणाच्या प्रक्रियेविरूद्ध बॅंकिंग कर्मचारी आणि अधिकारी एकत्र येत असून सरकारच्या या निर्णयाविरोधात संप पुकारला आहे. अखिल भारतीय बॅंक अधिकाऱ्याने आम्ही विलीनीकरणाच्या सरकारच्या निर्णयाला विरोध करत असून याअंतर्गत 26 आणि 27 सप्टेंबर रोजी देशव्यापी संप करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. या दोन दिवसांत सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांमध्ये कामकाज होणार नाही आणि सर्व प्रकारच्या ग्राहक सेवाही बंद ठेवल्या जाणार आहेत. यानंतर 28 सप्टेंबर महिन्यातील शेवटचा शनिवार आणि 29 सप्टेंबरला रविवार असल्याने बॅंका बंद राहतील. 30 सप्टेंबर रोजी बॅंकांचे अर्धवार्षिक बंद होईल, परंतु या काळात ग्राहक सेवा पुनर्संचयित केल्या जाणार आहे. सलग चार दिवस एटीएममधून पैसे काढणेदेखील एटीएम काढण्यावर परिणाम होऊ शकतो त्यामुळे पुढच्या तीन दिवसांत बॅंकेची कामे पुर्ण करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.