राज्याच्या सुख समृद्धीसाठी गणरायाला महसूल मंत्र्यांचे साकडे
कोल्हापूर – कोल्हापुरात गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरवात झालीय. पहिला मानाचा गणपती अशी ओळख असणाऱ्या तुकाराम माळी तालीम मंडळाच्या गणपतीचं पूजन करून सुरुवात झालीय. पालकमंत्री चंद्रकांत पाटील , महापौर माधवी गवंडी, जिल्हाधिकारी दौलत देसाई, विशेष पोलीस महानिरीक्षक सुहास वारके ,पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून आणि श्री ची आरती करून गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरवात झालीय.
तुकाराम माळी तालीम मंडळानं पारंपरिक ढोल पथक आणि पालखीतून मिरवणूक काढली असून सर्वच मंडळांनी शांततेत मिरवणूक काढण्याच आवाहन यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलंय. राज्यातील महापुराचे आलेले संकट दूर व्हाव ,दुष्काळ दूर व्हावे , निसर्गगाचे चक्र नियमित सुरू राहावे ,महाराष्ट्र मध्ये सुख समृद्धी आणि शांती नांदावी अस मागण पाटील यांनी मागितलं आहे. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी स्वतः ढोल वाजवून पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढण्याचे आवाहन गणेश मंडळांच्या कार्यकत्यांना केलंय.