नाशिक : नाशिक शहरासह ग्रामीण भागात पावसाचा जोर कायम राहिल्याने गोदावरी नदीला पूर आला आहे. संततधार पावसामुळे नाशिकमधील जनजीवन विस्कळीत झाले असून, खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी उद्या (5 आॅगस्ट, सोमवारी) नाशिक शहर आणि ग्रामीण भागातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.
#Maharashtra: All schools to remain closed in Nashik on 5th August, in view of continuous rainfall in the city.
— ANI (@ANI) August 4, 2019
नाशकात गेल्या 24 तासांमध्ये 1189 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तसेच त्र्यंबकेश्वरला 315, तर इगतपुरीत 220 मिमी इतक्मया पावसाची नोंद झाली आहे.