नवी दिल्ली : आज कारगिल विजयाची 20 वर्ष पुर्ण झाली असून देशभरात या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, राष्ट्रपती रामनाथ कोविंद देखील द्रासमध्ये शहिदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी जाणार आहेत. परंतु, सध्या श्रीनगरमध्ये वातावरण खराब असल्यामुळे राष्ट्रपती आपल्या नियोजित वेळेत पोहचणार नसल्याचे सांगण्यात येत आहे.
President Ram Nath Kovind to now celebrate ’20 years of #KargilVijayDivas‘ at Badami Bagh Cantonment in Srinagar today. He was supposed to visit Drass memorial, but due to bad weather his visit was cancelled.Three Services Chiefs will pay homage at Drass war memorial. (file pic) pic.twitter.com/J8ZFDhB46V
— ANI (@ANI) July 26, 2019
जम्मू-काश्मिरच्या द्रासमध्ये कारगिल विजय दिवसानिमीत्त शहिदांना श्रद्धांजली वाहण्याचा खास कार्यक्रम आयोजित केला आहे. श्रीनगरच्या खराब वातावरणामुळे इथली हेलिकॉप्टरची सेवा थांबवण्यात आली आहे त्यामुळे द्रासमध्ये येण्यास राष्ट्रपतींना त्यांच्या नियोजित वेळेच्या थोड्या उशिराने कार्यक्रमस्थळी पोहचावे लागत आहे. नियोजनानुसार राष्ट्रपती हे सकाळी 9.30 वाजता द्रासमध्ये पोहचणार होते.