नवी दिल्ली – जूनचा पहिला आठवडा संपत आला तरी अद्याप मान्सूनचे आगमन झाले नसल्याने चिंता वाढली आहे. देशभरात अद्यापही उष्णतेचा पारा चढाच आहे. अशातच इंदौरमध्ये वारंवार वीजकपात करत असल्याने सर्वसामान्य चांगलेच हैराण झाले आहेत. वीजकपातीचा फटका केवळ सर्वसामान्यांना बसत नसून व्हीव्हीआयपी माणसांनाही बसत असल्याचा प्रत्यय आज इंदौरमध्ये आला आहे.
हॉस्पिटलमधील वीजकपातीच्या मुद्दयावर इंदौरचे आरोग्य मंत्री तुलसी सिलावट बैठक घेत होते. यावेळी हॉस्पिटलमध्ये वीज कपात केली जाऊ नये अथवा झाल्यास लवकर वीजपुरवठा सुरळीत करावा, असे उपाय मांडले जात होते. बैठक चालू असतानाच अचानक लाईट गेल्याने सर्वच आश्चर्यचकित झाले. आठ मिनिटानंतर वीजपुरवठा सुरळीत झाल्यानंतर मंत्र्यानी अधिकाऱ्यांची चांगलीच खडपट्टी काढली.