नवी दिल्ली – भाजप पक्ष कधीच व्यक्ती केंद्रीत होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजप हा पक्ष अनेकांच्या विचारधारेवर उभा राहिला असून, तो कधीच एका व्यक्ती पुरता मर्यादित राहणार नाही. असं भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री ‘नितीन गडकरी’ यांनी म्हंटले आहे.
तसेच, हा पक्ष कधीच फक्त अटल बिहारी वाजपेयी यांचा नसून,ना कधी अडवाणींचा होता. आणि तो कधीच फक्त अमित शहा किंवा नरेंद्र मोदींचा पक्ष देखील असणार नाही.असं देखील गडकरींनी स्पष्ट केलं आहे. एका नामांकित वृत्तसंस्थेच्या मुलाखतीत ते बोलत होते. यंदाच्या २०१९ च्या लोकसभा निवडुकीत भाजपला अधिक मते मिळतील असा विश्वास देखील त्यांनी दाखवला.