इंदापूर, (प्रतिनिधी) – आगामी काळात नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर इंदापूर तालुक्यातील शेतीला पाण्याची कमतरता भासणार नाही. द्राक्षबागा तसेच उसाची शेती आदर्शवत करता येईल. खर्या अर्थाने ही निवडणूक प्रपंचाची आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या इंदापूर येथील सांगता सभेच्या प्रचारात अजित पवार बोलत होते. यावेळी माजी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री आमदार दत्तात्रय भरणे, भाजप नेते माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार यशवंत माने, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. शशिकांत तरंगे, पृथ्वीराज जाचक, प्रवीण माने, नवनाथ पडळकर, कल्याण आखाडे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले की, राज्य सरकारचा निधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार येथील यामध्ये कोणीही मनात शंका घेऊ नका. मात्र, केंद्राचा निधी आणण्यासाठी केंद्राच्या विचाराचा खासदार निवडून जाणे हे इंदापूर, बारामती, हवेली, पुरंदर, भोर-राजगड, मुळशी तालुक्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. त्यामुळे वेगळा विचार आणू नका नाहीतर पुढच्या पिढीचे वाटुळे होईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
दम देत नाही, मी आवाज चढवतो
पाणीप्रश्न सोडवण्यासाठी आमच्याकडे सगळी जंत्री तयार आहे. मी कुणालाही कधीही दमदाटी केलेली नाही जनतेच्या विकासाचे काम असेल तर मी अधिकार्याला एकदा सांगेन दोनदा सांगेन, मी दम देत नाही.फक्त मी माझा आवाज चढवतो. ए का काम झाले नाही रे, हा माझा आवाज आहे.त्याला मी काय करू, असा सवाल अजित पवार यांनी केला.
स्टेजवर बसायची हाऊस
इंदापूर मध्ये अजित पवारांची सभा सुरू असताना,अजित पवार बोलत असताना अचानकच स्टेजवरील काही कार्यकर्ते उठले. लगेचच अजित पवार यांनी या कार्यकर्त्यांना स्टेजवर बसायची लय हाऊस, असे म्हणत शाब्दिक टोला मारला काही क्षणातच उभे राहिलेले कार्यकर्ते खाली बसले.
दादा फक्त आम्हाला शेतीच्या पाण्यासाठी मदत करा, उजनी जलाशय परिसरात बुडीत बंधारे निर्माण केले पाहिजेत. नीरा नदीवर जे बंधारे नादुरुस्त झाले आहेत. त्यांना निधी टाकलेला आहे. ती कामे मार्गी लावतील. त्यामुळे शेतकर्यांनी चिंता करू नये. – दत्तात्रय भरणे, आमदार